Description
स्वस्थ,समृद्ध आणि आनंदी जीवनासाठी
प्रत्येक माणसाला आयुष्य स्वस्थ,समृध्द आणि आनंदी असावं अशी आस असते. मात्र त्यासाठी काय करायला हवं आणि काय सोडायला हवं. आयुष्य संतुलित राहावं यासाठी कोणकोणत्या गोष्टी अंगिकारणे आवश्यक आहे. त्यासाठी आहार,विहार, आचार, विचार यांच संतुलन कसं गरजेचं आहे,संतुलित जीवनासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचं महत्त्व, ध्यानाचं महत्त्व, प्रार्थनेचं महत्व,जगातील सर्वोत्तम संपत्तीचं महत्त्व, मर्यादा आणि मध्यममार्गाचं महत्त्व, मौन,कर्म प्रधानतेचं महत्त्व, क्रियाशील जीवनाचं महत्त्व,आजच्या जीवनात आवश्यक झालेली मोबाईल मर्यादा, संवादाचं महत्त्व आणि विचारांच महत्त्व असे कितीतरी विषय थोडं सकारात्मक चिंतन करून लघु ललित लेखांच्या स्वरूपात लेखकाने या पुस्तकात मांडले आहेत.
घरातील प्रत्येक व्यक्ती वाचू शकेल आणि वाचून झाल्यानंतर निखळ आनंदाच्या प्राप्तीसह हे पुस्तक आपल्या संग्रही असावं असं प्रत्येकाला वाटावं असाच लेखकाचा प्रयत्न राहिला आहे.







Reviews
There are no reviews yet.